अहिंसेच्या तीन बंदराना केंव्हाच दूर केलंय
पूर्वी मी होतो शांत सुस्वभावी होतो
बोललं जे ते सहन करत होतो
स्वतःलाच महान समजत होतो
एक गालात मारली की दुसरा पुढे करायचो
किती बी बोलला वंगाळ तरी कुणालाच नाही नडायचो
काही जण माझा मान करत होते
पण लपून शब्दांचे वार करत होते
अहिंसेच्या पुजाऱ्याला ते फुलाचं भासत होते
अन्याय होतच होता मानही आता दिसत होता
आता स्पष्ट दिसत होता फोलपणा अहिंसेचा
कदाचित यानेच हिनवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत होते
अन ते आणखी अन्याय करत होते हिनावत होते चिडवत होते
अखेर झाला विद्रोह अन सबुरीचा बांध तुटला
जो खात होता गालावर आजवर तो देत सुटला
आता अहिंसा पाळत नाही
म्हणूनच तर दुनिया मला जाळत नाही
एक सांगू का,
अन्याय सहन करण्याला अहिंसा म्हणत नाहीत
लढल्याशिवाय माणसं कधीच जिंकू शकत नाहीत
शंभर दिवस जगणे कामाचे काय
अभिमानाने जगायचे असेल तर वाघ बनण्यात गय काय
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
gspindiablogs@gmail.com
Tags:
गणेश पुरी च्या कविता
